Thursday, April 4, 2019

History and Politics

इतिहास आणि राजकारण


आज अचानक  लिहिण्याचे कारण म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आणि त्यावर केलेला विचार. काही गोष्टी आधीच क्लिअर करू इच्छितो. ते म्हणजे माझं ह्या सगळ्या विषयांमधील ज्ञान, सत्याची केलेली पडताळणी आणि माझी बुद्धिमत्ता ह्याचा एकंदरीत विचार करता, पुढील लिखाण कसे घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मी कुठल्याही गोष्टीला पुरावे सादर करण्यास जबाबदार नाही. मी आधीच कबूल करतो कि बऱ्याच गोष्टी मला माहित नाही आहेत.


परवा tashkent files ह्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला. त्यातला एक संवाद खूप आवडला "हा देश गांधींचा आहे, नेहरूंचा आहे.". "हा देश शास्त्रींचा का नाही." खरंच किती समर्पक प्रश्न आहे. हा देश स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, लोकमान्य टिळक आणि अश्या अनेक महान लोकांचा देश का नाही? थोडा विचार केला तर लक्षात येतं कि लहानपणापासून आपल्या मनावर ह्या गोष्टी बिंबवल्या गेल्या आहेत. आणि हेतुपुरस्सर आणि षडयंत्र रचून केल्या गेलेल्या ह्या गोष्टी आहेत. काही महान लोकांचा ज्वलंत इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये १ परिच्छेद किंवा जास्तीत जास्त १ धडा, ह्या पलीकडे जाऊ दिला नाही. उद्याने, पूल, योजना ह्यांच्या नावांच्या माध्यमातून इतर काही लोकांचा इतिहास वारंवार आपल्या समोर आणला गेला. इतिहास घडवण्यात अनेक लोकांचा सहभाग होता पण फक्त ह्या २-३ लोकांचा एवढा उदो उदो का केला गेला?


आपला देश “एक” असण्यामागे एक च व्यक्ती कारणीभूत आहे ते म्हणजे सरदार पटेल.
जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर संस्थाने भारतात विलीन करताना लोहपुरुष पटेल यांनी साम, दाम, दंड, भेद नीती वापरून केलेलं काम भारतवर्ष कधीही विसरू शकत नाही, विसरू नये. सरदार पटेल ह्यांचा काम जर इतिहासातून वजा केलं तर कदाचित भारत देशही युरोपातील देशांसारखा अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला असता.
सर्वांनी आवर्जुन बघावा असा सिनेमा - SARDAR Vallabhbhai Patel FULL HD MOVIE
https://youtu.be/qPliOfznh_0
अशा महान व्यक्तीला आता उत्तुंग मूर्ती बनवून दिलेली श्रद्धांजली हि स्तुत्य आहे. आणि अशी गोष्ट होणे गरजेचेच होते.


भारत हा स्वतंत्र झाला तो अहींसे मुळे कि सुभाषचंद्र बोस ह्यांचा Indian National Army मुळे. अजित डोवल, Ajit Doval, National Security Advisor ह्यांनी ह्या प्रश्नाचे एका मुलाखतीमध्ये दिलेले उत्तर ऐकण्यासारखे आहे. इंग्रजांची सगळ्यात मोठी ताकद होती भारतीय आर्मी आणि त्यातील सैनिक. त्यांचा वापर करून त्यांनी भारतीयांवर राज्य केले होते. आणि अशा ठिकाणीच हात घातला होता बोसबाबूंनी. आता आपलं काही खरं नाही म्हणून इंग्रजांनी काढता पाय घेतला होता. ह्या Indian National Army मधील सैनिकांना २०१९ प्रजासत्ताक दिन परेड मध्ये दिला गेलेला सन्मान उचितच नाही का? सुभाषचंद्र बोस सारख्या व्यक्ती बद्दल माहिती देणारे, लाल किल्ला येथे बनवलेले Kranti Mandir Netaji Subhas Chandra Bose Museum Red Fort हि भारताने दिलेली well-deserved श्रद्धांजली च आहे, नाही का?


भारताचे पंतप्रधान मोदी यांची अंदमान भेट. तेथील बेटांना दिलेली नवीन नावं- शहीद द्वीप, स्वराज्य द्वीप आणि नेताजी सुभाष चंद्र बोस बेट. आणि अंदमान भेटी मध्ये तेथील कारागृहातील त्या खोलीत स्वातंत्रवीर सावरकर यांना दिलेली श्रद्धांजली.
वर नमूद केलेल्या ह्या सगळ्या गोष्टींवरून हे मात्र नक्की सांगता येतंय कि काही गोष्टी हळू हळू बदलायला सुरुवात झाली आहे. Well-deserved लोकांचा सत्कार केला जात आहे,त्यांना मान मिळत आहे. ह्या वर्षी झालेले पद्म पुरस्कार हि तुम्ही बघू शकता. बदल दिसण्यासारखा आहे.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाली. आता इंटरनेट, सोशल मीडिया घराघरात पोचलं. आता लोकांना आपले विचार जे प्रवाहाच्या विरोधात असले तरीही झटक्यात मांडता येतात आणि तितक्याच झपाट्याने ते पसरतात. ह्याचा फायदा आपण घेणार का?
खरा इतिहास आपल्याला ७० वर्ष उपलब्ध असेल सुद्धा पण तो आपण सगळ्यांनी शोधला नाही, वाचला नाही, ह्यात आपली चूकच झाली. आता आपण ती चूक सुधारणार का? आपल्या पुढच्या पिढीला योग्य इतिहास आपण शिकवणार का?
हा योग्य दिशेने होणारा बदल आपण रोखणार? कि ह्याचं समर्थन करणार?


~ सुयश अभ्यंकर
४ एप्रिल २०१९

Thursday, March 21, 2019

डलहौसी, धर्मशाळा आणि अमृतसर ट्रिप

डलहौसी, धर्मशाळा आणि अमृतसर ट्रिप


मी ह्या आधी २ वेळा हिमाचल प्रदेश ला जाऊन आलो आहे आणि तिकडच्या पर्वतरांगा नद्या ह्यांच्या प्रेमात पडलो आहे. त्यामुळे डलहौसी, धर्मशाळा आणि अमृतसर ट्रिप करायचे ठरवले. ह्या वेळी स्वतः प्लांनिंग न करता वीणा world तर्फे जायचे ठरवले. सुट्ट्यांच्या तारखा आणि ग्रुप टूर च्या तारखा ह्या वेगळ्या असल्यामुळे customized टूर बुक केली. विमान तिकिटे स्वतः वेगळी बुक केली. आमची १ मार्च २०१९ ला रात्री ची flight होती.
पुण्याहून रात्री ११.३० ला निघून दिल्ली ला स्टॉप घेऊन सकाळी ६ ला अमृतसर ला पोचलो. आमचा ड्राइवर पंकज एअरपोर्ट वर आला होता. तिकडून डलहौसी ला जायचा प्रवास सुरु झाला. ५-६ तासाचा हा प्रवास होता. पठाणकोट मार्गे पंजाब सोडून हिमाचल मध्ये प्रवेश केला. वाटेत एके ठिकाणी नाष्टा केला आणि तेव्हाच उत्तर भारतीय सुंदर पदार्थांना सुरुवात झाली.
एकदम सॉफ्ट पनीर पकोडे, कांदा बटाटा पराठे, लोणचं आणि सोबत चहा असा छान नाश्ता झाला. जसे जसे डलहौसी जवळ येत गेले तसे आजूबाजूला snow दिसायला सुरुवात झाली. मार्च महिना असल्याने खूप snow असेल असं वाटलं नव्हतं पण ह्या वर्षी मार्च मध्ये सुद्धा हिमवर्षाव झाला. माऊंट व्यू हॉटेल ला पोचलो. अगदी डलहौसी बसस्टॅण्ड च्या चौकामध्येच हॉटेल आहे. सुंदर आणि प्रशस्थ रूम मिळाली होती.
संध्याकाळी डलहौसी च्या मॉल रोड ला गेलो. साधारण ३ किलोमीटर अंतर असेल पण पूर्ण चढ आणि वळ्णावळणाचे रस्ते त्यामुळे अंतर जास्त वाटते. तिकडे एका छानशा दिसणाऱ्या कॅफे मध्ये गरमा गरम टोमॅटो सूप घेतले. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आणि भ्रमनिरास झाला. सीझन नसल्यामुळे अनेक दुकाने बंद होती. परतीचा रस्ता संपता संपत नव्हता. कपडे आणि बूटही ओले झाले. आम्ही एखादे जॅकेट आणि थर्मल घेऊन गेलो होतो. पण इकडची थंडी बघून कानटोपी आणि मोजे गरजेचे आहेत हे कळाले. हॉटेल च्या समोरच चौकात एक छान दुकान होते. दुसऱ्या दिवशीसाठी snow मध्ये चालणारे बूट सुद्धा भाड्याने घेतले.
परत रूम वर आलो तेवढ्यात ड्राइवर ने फोन करून सांगितलं कि बाहेर snowfall होत आहे. लगेच बाहेर आलो. सुंदर snowfall अनुभवता आला.



दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रूम बाहेर आलो आणि हॉटेल मधून सुंदर नजारा दिसत होता. आदल्या दिवशी धुके आणि अंधार ह्या मुळे मागे काय आहे ह्याची जाणीवही झाली नव्हती.
त्या नंतर sightseeing साठी निघालो. पंचपुला येथे गेलो. थोड्या पायऱ्या चढून सुंदर स्पॉट होता. एका स्वातंत्र्यसेनानी चा पुतळाही येथे बघायला मिळतो.
नंतर snow पॉईंट ला गेलो. एवढं snow आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग बघून मंत्रमुग्ध झालो.
बर्फात खूप खेळलो. स्नो मध्ये चालणे वाटते तितके सोपे नसते हे कळले. तिथे गरमा गरम मॅगी आणि चहा घेतला. त्या नंतर मुख्य गांधी चौकात असलेले एक चर्च आणि तिबेटी मार्केट मध्ये चक्कर मारली. खूप हिमवर्षाव आणि landslide मुळे रस्ते बंद असल्या कारणाने आम्हाला खज्जियार आणि चमेरा तलाव अशा २ ठिकाणी जाता आले नाही.

दुसऱ्या दिवशी धर्मशाळा साठी निघालो. धर्मशाळा शहर खाली असून तिथून ३-४ किमी वरच्या बाजूला मॅक्लॉडगंज हे गाव आहे. तिथे प्राईड सूर्या हॉटेल मध्ये पोचलो. चेकइन करून थोड्या वेळात जेवणासाठी चालत च निघालो. अशोका ह्या ३ मजली हॉटेल मध्ये गच्ची वर बसून जेवण केले.
नंतर दलाई लामा मंदिराकडे निघालो १५ मिनिटे चालून तेथे पोचलो. हे मंदिर खूप भव्यदिव्य नाही. कुठे जायचे आहे काय बघायचे आहे हे सांगायला तेथे कोणी नसते. बॊध्द भिक्खू आपल्या प्रार्थना म्हणण्यात मग्न असतात.


त्या नंतर मॅक्लॉडगंज मार्केट मध्ये चक्कर मारली. फार मोठे मार्केट असेल अशी अपेक्षा होती पण तसे काही नव्हते. २ रस्ते साधारण ५०० मीटर लांबीचे आणि मार्केट संपतं. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मशाळा sightseeing ला निघालो. सकाळी भागसु नाग मंदिर आणि धबधबा बघायला निघालो. शंकराचे सुंदर मंदिर आहे. बाजूला छोटा तलाव आहे.


तिथून पुढे साधारण अर्धा तास चालत पुढे गेलो कि धबधबा दिसतो. सुंदर फेसाळते पाणी बघून मन प्रसन्न होते. नंतर St. John in the Wilderness चर्च ला भेट दिली. नाव वाचून अंदाज बांधला होता तसे उंच झाडांनी वेढलेले पुरातन चर्च आहे.
तिथून पुढे दल लेक च्या दिशेने निघालो.
तिथूनच पुढे नड्डी व्यू पॉईंट होता. तिथे डोंगराला वळसा घालणारा रस्ता होता. गाडीतून उतरून चालत निघालो. सुंदर व्यू दिसत होता.



साधारण १ किलोमीटर आत आलो आणि पावसाळा सुरुवात झाली. आणि तापमान ० च्या आसपास असल्याने पाण्याचे गारांमध्ये रूपांतर होत होते. जवळ एक म्हातारे काका चहा-मॅगी ची टपरी चालवत होते. त्या ठिकाणी खाल्लेली मॅगी आणि गरमागरम चहा कायम लक्षात राहील. थोडे जास्तीचे पैसे दिल्यानंतर त्यांना झालेला आनंदाचं काही मोल नव्हतं.

भारतीय क्रिकेट टीम धर्मशाळा येथे मॅच असल्यावर जेथे हमखास येते अशा मॅकॅलॉ रेस्तरॉ मध्ये जेवण केले. संध्याकाळी धर्मशाळा टाउन मध्ये जाऊन पिक्चर बघायचा प्लॅन बनवला. शो सुरु व्हायच्यावेळी कळले कि फक्त ५-६ तिकिटे विकली गेल्याने शो कॅन्सल झाला आहे. खूप वेळ असल्याने धर्मशाळा मार्केट मध्ये निघालो आणि दणकून शॉपिंग झालं. तिकडून परत येताना लोकल टॅक्सी केली. रेस मध्ये भाग घेतल्याच्या आवेशात तो तरुण ड्राइवर अल्टो गाडी चालवत होता. शेवटी जीव मुठीत धरून हॉटेल वर पोचलो.
दुसऱ्या दिवशी धर्मशाळा मॅक्लॉडगंज हुन अमृतसर साठी निघालो. वाटेत ३ ठिकाणे बघायचे ठरले. सर्वप्रथम War Memorial ला पोचलो. युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची आठवण म्हणून सुंदर स्मारक बनवले आहे. आवर्जून भेट द्यावी असे.




त्यानंतर खूप प्रसिद्ध असलेल्या जगातील सर्वात उंचीवरील क्रिकेट स्टेडियम ला पोचलो. सुंदर हिरवळ आणि मागे हिमाच्छादित पर्वतरांगा असे विहंगम दृश्य होते.
पुढच्या वेळी मॅच असताना येऊ असे ठरवून येथून निघालो. त्या नंतर कांग्रा किल्ला बघायला गेलो. (Did you know: Kangra Fort is the largest fort in the Himalayas and probably the oldest fort in India. tourmyindia.com विकिपीडिया) अनेक आक्रमणे आणि भूकंप सोसलेला हा किल्ला, त्याचे अवशेष वरून खाली खणलेले राधा कृष्ण मंदिर (ज्याचा फक्त मागचा भाग आता उभा आहे) हे सर्व बघून, गौरवशाली इतिहासाचा ऐकून गहिवरून आले.


तिकडे ऑडिओ गाईड ची सुविधा उपलब्ध असल्याने authentic आणि detailed इतिहास ऐकायला मिळाला. अशी सुविधा भारतात अनेक ठिकाणी करणे गरजेचे आहे.
त्यानंतर अमृतसर च्या दिशेने निघालो. अमृतसर मध्ये Country Inn हॉटेल मध्ये राहण्याची सोय केली होती.
दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम सुवर्णमंदिर बघायला पोचलो. १ किलोमीटर आधीच पार्किंग करून चालत जावे लागते. येथील सर्व इमारती आणि दुकाने ह्यांचे बांधकाम आणि रंग एकाच पद्धतीने ठेवले आहे. दिसायला छान दिसते.


डोक्याला बांधायचे फडके, बॉर्डर ची टूर, आणि शास्त्री कपड्यांच्या मार्केट ची टूर ह्या गोष्टी विकणारे जवळपास १००० लोकं वारंवार येऊन विचारणा करत होते.
सुवर्णमंदिराला पोचलो. आत जाण्याआधी कुठल्याही प्रकारचे security चेकिंग होत नाही. ह्याने थोडा अचंबा वाटला. आत गेल्यावर समोर पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी सुंदर सुवर्णमंदिर दिसते. पांढरा संगमरवर, शांत पाणी असे एकंदरीत प्रसन्न वातावरण असते. निळ्या रंगाच्या गणवेशात मंदिराचे उंच आणि धष्टपुष्ट रखवालदार फिरत असतात. एका बाजूला पाण्यात डुबकी मारून नमस्कार करणारी लोकं असतात. महिलांसाठी आडोशाला तशी सोय केलेली आहे. १ तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

थोडा वेळ तिथे घालवून नंतर जालियनवाला बाग येथे पोचलो. भारतीय इतिहासातील दुख्खद आणि महत्वपूर्ण घटना. आत जाणारा निमुळता रास्ता. विहीर (ज्यातून १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते), भिंतींवरील गोळ्यांच्या खुणा, सैनिकांच्या आकारात कापलेली झुडुपे बघून बाहेर आलो. तेथे इतिहास वाचला. उधम सिंग (ज्यांनी ह्या हत्याकांडाचा बदला घेतला होता) यांचा पुतळा नावाच्या शेजारीच उभा केला आहे.


तेथून जवळ च brothers आणि धारवान ढाबा अशी २ हॉटेल आहेत. खूप स्वादिष्ट जेवण येथे मिळते. पनीर कुलचा लस्सी छोले


असे छान जेवण करून अटारी -वाघा सीमारेषा आणि change of guards समारोह बघायला निघालो. सरळ रस्ता आहे, १० किलोमीटर वरून च भारताचा झेंडा डौलाने फडकताना दिसतो. पार्किंग ची छान सुविधा येथे केली आहे. एका अर्ध्या स्टेडियम सारखी इमारत बांधली आहे. दुसरीकडे पाकिस्तान बॉर्डर, जिन्ना चा फोटो, पाकिस्तान चा झेंडा दिसतो. BSF चे जवान parade conduct करतात. सगळीकडे देशभक्तीचे वातावरण असते. भारतमाता कि जय, वंदे मातरम आणि जय हिंद ह्या ३ घोषणा सोडून इतर कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. ५ वाजता कार्यक्रम सुरु होतो आणि साधारण ४५ मिनिटे चालतो.




तेथून पुन्हा हॉटेल वर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी Partition museum बघायला निघालो. हे एक सुंदर म्युझियम आहे. फाळणी बद्दल खुप छान माहिती येथे दिली आहे. लोकांचे अनुभव, त्यांच्या वस्तू येथे पाहायला आणि ऐकायला मिळतात. लोकांना आवाहन हि केले जाते कि कोणाच्या कुटुंबात अशा गोष्टी असल्यास त्याची माहिती द्यावी जेणेकरून त्याही येथे मांडल्या जातील.

अमृतसर आणि पंजाब ने फाळणी ची सर्वात जास्त झळ सोसली होती. अमृतसर भारताच्या इतिहासात एक महत्वाचे शहर आहे याची जाणीव होते.

अशा प्रकारे आम्हाला ह्या टूर मध्ये बघायच्या ठिकाणांची लिस्ट संपली होती.


ज्या दिवशी आमची ट्रिप सुरु झाली त्याच दिवशी विंग कमांडर अभिनंदन ची वाघा अटारी सीमेवर पाकिस्तान ने सुटका केली होती. त्यामुळे टूर सुरु होण्याच्या वेळेला तंग वातावरण होते. ट्रिप कॅन्सल कर, जीव महत्वाचा असे सल्ले मिळाले होते. पण अमृतसर ऐवजी चंदिगढ ने बाय रोड जाऊ असा प्लॅन B तयार करून शेवटी जाण्याचे ठरले होते. Actually ट्रिप मध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे tension चा लवलेशही नव्हता आणि पूर्ण ट्रिप शांततेत पार पडली.


~ धन्यवाद
सुयश अभ्यंकर  

Friday, October 19, 2018

आनंदवन, हेमलकसा सोमनाथ अभ्याससहल

आनंदवन, हेमलकसा सोमनाथ अभ्याससहल

हाथ लगे निर्माण मे। नाहीं मांगने, नाहीं मारने।
~बाबा आमटे

बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबाचं काम ऐकिवात सगळ्यांनाच असतं. पण ते प्रत्यक्षात बघण्याची इच्छा होती. आणि त्याच सुमारास समजलं की -
ओपश सोशियो-कमर्शिअलस् प्रा. लि या सामाजिक क्षेत्रामधे कार्यरत असणाऱ्या कंपनीतर्फे "सामाजिक प्रकल्पांना भेट" या उपक्रमाअंतर्गत *"आनंदवन, हेमलकसा सोमनाथ"* या बाबा आमटे यांच्या सामाजिक प्रकल्पांना भेट देणारी अभ्याससहल आयोजित करण्यात आली आहे .
मी, माझे आई बाबा आणि लिमये काका काकू अशा ५ जणांचं नाव रजिस्टर केलं. सुरुवातील जे पैसे भरले त्या नंतर शेवटपर्यंत कुठलेही hidden charges ओपश ने घेतले नाहीत. आनंदवन येथे पर्सनल खरेदी केली तेवढाच काय तो खर्च करावा लागला.
सहलीच्या थोडे दिवस आधी एक प्रि टूर सेशन ठेवण्यात आला होता. ह्या सेशन मधे पुढील गोष्टी थोडक्यात सांगण्यात आल्या -
आपण ह्या टूर ला का जात आहोत, तिकडे कोणत्या गोष्टी बघायला मिळतील, आपली अपेक्षा काय असावी, तिकडे काय करावं आणि काय करू नये. सगळ्यांबरोबर ओळखही झाली.
टूर च्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता पुणे स्टेशन ला भेटलो. तिकडे टूर मॅनेजर पल्लवी कविता बरोबर ओपश टीम मधील इतर काही लोकं सुद्धा आली होती. सगळ्यांना तिकिटे देण्यात आली. आमचा प्रवास सुरु झाला. AC ३ tier ची तिकिटे बुक करण्यात आली होती.
ओपश तर्फे सगळ्यांसाठी जेवण arrange करण्यात आले होते. छान पॅकिंग असल्यामुळे ट्रेन मध्ये असूनही खाताना त्रास झाला नाही. अधून मधून snacks देतच होते. ह्या पूर्ण सहलीमध्ये खाण्याच्या बाबतीत आमचे खूप लाड करण्यात आले. नाश्ता, चहा, अधून मधून सुका खाऊ आणि जेवण सगळं वेळच्या वेळी आणि चविष्ट आणि पुरेसं असं होतं.
दुसऱ्या दिवशी वर्धा स्टेशन ला उतरलो. तिकडून पुढील प्रवासासाठी एक बस तयार होती. तिकडून आम्ही आनंदवन ला पोचलो.

लोटी रमण गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था होती. एका रूम मध्ये ४ लोकं अशा प्रकारे विभागणी होती. प्रत्येक रूम ला अटॅच बाथरूम होते.



त्या नंतर थोडं फ्रेश होऊन आम्ही बस ने श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या समाधी
(श्रद्धावन) ला भेट दिली. सर्व परिसर हिरवागार होता.



तिकडचा एक तरुण कार्यकर्ता आमच्या बरोबर होता. आम्हाला माहिती देत होता.

नंतर आम्ही मध्यवर्ती भोजनालय बघायला गेलो. आनंदवन येथे प्रत्येक घरी स्वयंपाकघर नाही. सगळ्यांचं जेवण इकडे बनवलं जात. शेतात आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना डब्बे पोचवले जातात. आणि अशा प्रकारे एकोपा जोपासला जातो. ह्या स्वयंपाकघरात सौरऊर्जा प्रकल्प ही आहे.





त्या नंतर जेवणाची वेळ झाली जेवणाची वेळ झाली होती. आम्ही अतिथी भोजनालयाकडे निघालो. सगळे पदार्थ स्वादिष्ट. वाढायला इकडचे कार्यकर्ते होते. इकडे फार मनुष्यबळ नाही. जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापले ताट घासून ठेवायचे असते.



थोडी विश्रांती घेऊन आम्ही आनंदवन येथील कार्याची माहिती घेण्यासाठी 'गोकुळ' येथे गेलो. 

तिथे आधी एक विडिओ दाखवण्यात आला. नंतर तेथील कार्यकर्त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांनतर प्रभू सर यांच्याबरोबर आनंदवन मध्ये फेरफटका मारावयास निघालो.
तेथील हॉस्पिटल, अपंगांची कार्यशाळा, प्रिंटिंग प्रेस, बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्र असे विविध विभाग आम्ही बघत बघत पुढे जात होतो.







सगळे कार्यकर्ते आपापल्या कामात मग्न झाले होते. काही लोकं ग्रीटिंग कार्ड बनवत होते, काही काष्ठ शिल्प. अंध व्यक्ती सतरंजी विणत होत्या. काही ठिकाणी जुन्या टायर पासून चपला बनवल्या जात होत्या. हाताने अपंग असल्याने पायाने ग्रीटिंग कार्ड बनवणाऱ्या शकुंतला ला बघून सगळे मंत्रमुग्ध झाले.


फिरून झाल्यावर संध्याकाळी चहापान झाल्यावर प्रदर्शन आणि विक्री केंद्रावर बऱ्याच लोकांनी खरेदी केली. आमटे कुटुंबाला मिळालेले सर्व पुरस्कार येथे बघायला मिळतात.


दुसऱ्या दिवशी सकाळी हेमलकसा साठी निघालो. वाटेत अत्यंत चविष्ठ नाष्टा केला. 

लोक बिरादरी प्रकल्पाला पोचलो.
हेमलकसा येथील डॉ प्रकाश आमटे यांच्या कार्याबद्दलची एक विडिओ क्लिप दाखवली आणि स्वयंसेवकाने आमच्याशी संवाद साधला. प्राण्यांच्या अनाथालयाची सैरही घडवली. हे झू नसून अनाथालय आहे हे सुद्धा समजलं. 






ह्या सगळ्यानंतर प्रकाश सरांना आणि मंदाकिनी मॅडम यांना भेटायची इच्छा होत होती. आणि थोड्याच वेळात आमची ती इच्छा पूर्ण झाली. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांनी घातलेल्या चपला आनंदवन येथे रबरी टायर पासून चपला बनवण्याच्या कार्यशाळेत बनवलेल्या होत्या. ओपश टीम ला या ग्रेट व्यक्तिमत्त्वांना भेटायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!

त्या नंतर आम्ही लगेचच सोमनाथ येथे जाण्यासाठी निघालो. सोमनाथ म्हणजे आनंदवन येथील लोकांचे पुनरुज्जीवन करून डॉ विकास आमटे यांनी वसवलेलं निसर्गरम्य गाव, आणि हे साध्य झालंय लोकांच्या श्रमदानामुळे . इकडे नानाविध प्रयोग करून शेती केली जाते. शेततळी बांधली जातात, श्रमदान केले जाते. टायर पासून बांधलेला बंधारा सुद्धा येथे बघायला मिळतो.
सोमनाथ येथे दर वर्षी श्रमदान शिबीर घेण्यात येते ते म्हणजे "श्रम संस्कार छावणी". बाबा आमटे म्हणत श्रम संस्कार छावणी म्हणजे तरुणांना संवेदनशील, जबाबदार, विकासात्मक नागरिकांमध्ये रूपांतरित करण्याचा कारखाना!

काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे आनंदवन, हेमलकसा सोमनाथ या तीनही ठिकाणी सगळे लोकं प्रसन्न होते. जे काम करतोय ते त्यांना आवडत होतं , कोणीही तक्रार करत नव्हते. श्रम ही है श्रीराम हमारा हे ब्रीदवाक्य मनापासून पळत होतें.





आम्ही ठरवलेली ठिकाणे पाहून झाली होती पण थोडा वेळ शिल्लक होता. सेवाग्राम हे ओपश च्या पॅकेज मधे मात्र नव्हते तरीही ओपश च्या मित्रांनी आम्हाला सेवाग्राम आश्रमाचे दर्शन घडवले.


तो पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा वर्धा स्थानकात पोचलो. परतीचा प्रवास सुरु झाला. आमची अभ्यास सहल संपली खरी पण येथील कार्याने सगळेच भारावून गेलो होतो. नवीन ओळखी झाल्या होत्या. ओपश कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. काही गोष्टींचा मनापासून उल्लेख केला पाहिजे. आपल्या कुटुंबातील एक असल्याप्रमाणे कविता आणि पल्लवी आपली काळजी घेतात. हवं नको ते बघतात. बरेच वयोवृद्ध लोक आमच्या ट्रिप ला आले होते. सगळ्यांनी तेवढंच एन्जॉय केलं. सगळं मॅनेजमेंट परफेक्ट होतं.
लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी ह्या मुख्य उद्दिष्टाने जरी ओपश टूर अरेंज करत असते तरीही सगळ्या गोष्टी एकदम professionally मॅनेज केल्या जातात हे कौतुकास्पद. ओपश ला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
टूर झाल्यानंतर काही दिवसांनी post tour session घेण्यात आला. सगळ्यांशी पुन्हा भेटी झाल्या. आमच्या ग्रुप पैकी बरेच जण हे ट्रिप नंतरही ओपश च्या अनेक इतर सामाजिक कार्यात कार्यरत आहेत.

~सुयश अभ्यंकर~
https://www.facebook.com/opashsociocommercials/videos/683998791799732/

Opash Socio-Commercials Pvt. Ltdhttp://opash.co.in/info@opash.co.in📞 अधिक माहितीसाठी संपर्क -*९८८१२३३३७४*, *०२०-२५४६११४४*


History and Politics

इतिहास आणि राजकारण आज अचानक  लिहिण्याचे कारण म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आणि त्यावर केलेला विचार. काही ग...